मुंबईचा 20 धावांनी विजय   

मुल्लानपूर : आयपीएलच्या 18 व्या हंगामात शुक्रवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात उपांत्य फेरीचा सामना झाला. हा  सामना मुंबईने 20 धावांनी जिंकला. या सामन्याआधी मुंबईच्या संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि तो सार्थ ठरविला.
 
गुजरात टायटन्सला मुंबई इंडियन्सकडून पराभवाचा सामना करावा लागला. यासह गुजरातचा प्रवास संपला आहे. तर पाच वेळा विजेत्या मुंबई इंडियन्सने सहाव्या विजेतेपदाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने कालच्या सामन्यात गुजरात टायटन्सचा 20 धावांनी पराभव केला. आता क्वालिफायर-2 मध्ये पंजाबशी भिडणार आहे. 
 
पहिल्यांदा खेळताना मुंबई इंडियन्सची सुरुवात जबरदस्त झाली. रोहित शर्मा आणि त्याचा नवीन सलामीवीर जोडीदार जॉनी बेअरस्टो यांनी शानदार सलामी दिली. पॉवरप्लेमध्ये रोहित दोन जीवदान मिळाले आणि त्याने त्याचा पुरेपूर फायदा घेतला. दोघांनी मिळून पहिल्या 6 षटकात 79 धावा केल्या. पण साई किशोरने ही जोडी फोडली. 22 चेंडूत 47 धावा काढून बेअरस्टो बाद झाला. त्यानंतर सूर्यकुमार यादव संघाच्या माजी कर्णधाराला पाठिंबा देण्यासाठी आला. रोहितने वादळी खेळी खेळली आणि 50 चेंडूत 81 धावा केल्या. या धमाकेदार खेळीदरम्यान रोहितने दोन मोठे विक्रमही आपल्या नावावर केले. खरं तर, हिटमन आता आयपीएलमध्ये 300 षटकार मारणारा एकमेव भारतीय फलंदाज बनला आहे. याशिवाय, त्याने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत 7000 धावांचा टप्पाही ओलांडला. त्याच वेळी, सूर्यकुमारने 33 धावांचे योगदान दिले. 
 

Related Articles